आज जग एका मोठ्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर तयार झालेली जागतिक व्यवस्था हळूहळू कमकुवत होत चालली आहे. देशांमधील सहकार्य कमी होत असून स्पर्धा वाढत आहे. अर्थव्यवस्था, राजकारण आणि तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रांत एकाच वेळी मोठे बदल होत आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध गुंतवणूकदार Ray Dalio भारताच्या भवितव्याबद्दल सकारात्मक मत व्यक्त करतो, हे विशेष लक्षवेधी ठरते.
Bridgewater Associates चे संस्थापक असलेल्या Dalio यांच्या मते, इतिहास हा ठरावीक यांत्रिक पॅटर्न्सचा परिणाम असतो. राष्ट्रे कशी उगवतात, बहरतात आणि उतरती कळा कशी लागते हे समजून घेण्यासाठी त्यांनी पाच मूलभूत शक्तींचे फ्रेमवर्क मांडले आहे. या पाच शक्ती आज एकाच वेळी सक्रिय झाल्या असून, याच संयोगाच्या क्षणी भारत एका ‘Wonderful Arc’ मध्ये प्रवेश करत आहे.
Dalio यांचे भारताबाबतचे निरीक्षण थेट आणि स्पष्ट आहे. भारत आज अशा विकास टप्प्यावर आहे, जिथे “पुरेसे भांडवल नसण्यापासून भक्कम पायाभूत सुविधा उभारण्यापर्यंत”चा प्रवास सुरू आहे. तुलनेने कमी sovereign debt, तरुण व कुशल लोकसंख्या, वेगाने विस्तारत असलेली physical infrastructure (रस्ते, बंदरे, लॉजिस्टिक्स) आणि digital public infrastructure (UPI, Aadhaar, DPI stack) यामुळे भारताकडे पुढील दशकात सर्वात वेगवान growth rate देण्याची क्षमता आहे.
Dalio भारताला आजच्या चीनशी नव्हे, तर ३० वर्षांपूर्वीच्या चीनशी तुलना करतो. म्हणजेच भारताची सध्याची ‘actual power’ अजून मर्यादित असली, तरी growth potential प्रचंड आहे. तात्कालिक लोकप्रियतेपेक्षा दीर्घकालीन structural reforms वर भर देणारे नेतृत्व भारतासाठी अनुकूल आहे
Dalio’s 5 forces redefining global power of India
पहिली शक्ती: Debt and Money Cycle
दुसरी शक्ती: अंतर्गत राजकीय सुव्यवस्था व अस्वस्थता
तिसरी शक्ती: आंतरराष्ट्रीय जागतिक व्यवस्था
चौथी शक्ती: निसर्गाचे आघात
भारतासाठी हा धोका असला, तरी renewable energy, climate adaptation आणि green infrastructure मध्ये होणारी गुंतवणूक दीर्घकालीन संधीही निर्माण करते.
पाचवी शक्ती: तंत्रज्ञान आणि मानवी कल्पकता
या सगळ्यांचा एकत्रित निष्कर्ष असा की जग सहकार्याच्या युगातून स्पर्धेच्या युगात प्रवेश करत आहे. Trade wars, tech wars आणि geopolitical influence wars हे त्याचे स्पष्ट संकेत आहेत. Dalio एका ऐतिहासिक निरीक्षणाकडेही लक्ष वेधतो मोठ्या संघर्षांमध्ये थेट सहभागी न होता, तटस्थ भूमिका राखणारे देश अनेकदा जास्त समृद्ध होतात, कारण विजेते आणि पराभूत दोघेही शेवटी कर्ज आणि विनाशाने थकलेले असतात.
याच पार्श्वभूमीवर जागतिक सत्तासंतुलन नव्याने घडत असताना, योग्य धोरण, संस्थात्मक मजबुती आणि भांडवली शिस्त राखली, तर भारत हा केवळ वेगाने वाढणारा देश न राहता, नव्या जागतिक व्यवस्थेतील निर्णायक शक्ती ठरू शकतो. Ray Dalio यांच्या नुसार इतिहास हा noise, speed किंवा short-term dominance ला महत्त्व देत नाही. India’s “Wonderful Arc” ही हमी नसून, एक window of opportunity आहे.




